नाव नोंदणी सुरु
उदघाटक: डॉ.विनय कोरे
अध्यक्ष, वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूह,
प्रमुख पाहुणे: डॉ.उमाकांत दांगट
माजी विभागीय आयुक्त: महसूल
गेली काही वर्ष आपण बघतो की, शेतकऱ्यांचे प्रश्न जटील झाले आहेत. शेतकऱ्यांचे सर्व मूलभूत हक्क हडपले आहेत. शेतकऱ्यांवर न्यायबंदी लादली आहे. शेतकरी कर्जातच जन्मतो आणि कर्जातच आत्महत्या करतो. महाराष्ट्रात रोज कुठं न कुठं तरी शेतकरी आत्महत्या होतेच आहे. देशात सरासरी ४३ शेतकरी दररोज आत्महत्या करत आहेत. देशात प्रचंड आर्थिक विषमता का तयार झाली आहे.
हे नेमकं का होत आहे? हे समजून घेण्यासाठी प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव जिल्ह्यातील किसानपुत्रासाठी किसानपुत्र आंदोलनाचे ६ वे राज्य स्तरीय शिबिर, वारणानगर येथे आयोजित केले आहे.
या शिबिरात शेतकरी विरोधी कायदे (सिलिंग, आवश्यक वस्तू व जमीन अधिग्रहण) समजावून दिले जातील. त्याच बरोबर किसानपुत्रांसोबत चर्चा करुन त्यांचे प्रश्न समजून घेतले जातील.
याबाबत काही प्रश्न
१. शेतकरी आत्महत्या का करत आहेत?
२. शेतकरी विरोधी कायदे कोणते व त्यांमुळे कसा बसला गळफास?
३.संविधान शेतकरी विरोधी कसे बनवले गेले?
४. कर्जमाफी व अनुदान नेमके किती दिवस?
५. किसानपुत्र म्हणून माझी जबाबदारी काय?
६. न्यायबंदी म्हणजे काय?
७. किसानपुत्र आंदोलन काय आहे?
८. शेतकरी स्वातंत्र्य म्हणजे काय?
९. शेतकरी प्रश्न व आत्महत्या रोखण्यासाठी काय करणे गरजेचे आहे?
१०. सत्ता परिवर्तन महत्वाचे की व्यवस्था परिवर्तन महत्वाचे?
असे अनेक प्रश्न जे किसानपुत्रांना पडले असतील ते आपण या शिबिर माध्यमातून समजून घेऊ या..
आपण जर या शिबिरात भाग घेऊ इच्छित असाल तर नक्की संपर्क करा आणि आपली नोंदणी करा.
शिबिर फक्त नोंदणी केलेल्या किसान पुत्रा साठीच असणार आहे.
नाव नोंदणीची अखेरची तारीख: २५ डिसेंबर, २०१८.
चिदंबर चंदूरकर : 9922331122
– किसानपुत्र आंदोलन
8411909909