सविस्तर माहितीसाठी :- बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल प्रगतिशील किसानपुत्र बबन आबदार पारंपरिक पिके सोडुन फुलशेती करण्याचे ठरवले त्यातुन त्यांनी २ एकर मधे झेंडुची फुले लागवड केली.मल्चिंग ,ठीबक औषध फवारणी आदि.एकुण २ लाख रु.खर्च आला.परंतु आता फुललेली फुले व कोरोनामुळे बाजारपेठा बंद असुन फुलाची शेतातच माती होणार आहे.
बबन आबदार:- २ लाख रू खर्च झाला, पिक जोमात आले आहे,अंदाजे ४-५ लाख रू उत्पन्न अपेक्षित होते.परंतु कोरोना मुळे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार बाजारपेठावर परिणाम झाला आहे. दलालांच्या हाती पिक पडलें तर पिळवणूक केली जाते.ने-आन करणे परवडत नाही.
मनिषा आबदार :-
फुलांची लागवड करण्यासाठी दररोजच्या ५-६ महीला मजूर येत असत. मल्चिंग , बेड काढणे आदि कामं मोठ्या कष्टाने पिकवलेली झेंडूची फुले मातीत मिसळलेली उघड्या डोळ्यांनी पाहत राहणं एवढंच हातात आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार आम्ही सहकार्य करत आहोत.परंतु कोरोना संपल्यावर जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून आर्थिक मदतीचा हात देऊन आधार द्यावा हीच कळकळीची विनंती.
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर :-
किसानपुत्र आंदोलक म्हणून. पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांना एवढीच नम्र विनंती आहे किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते मा.अमिर हबिब यांनी शेतकरी समस्यांवर सखोल अभ्यास करून शेतकरी विरोधी कायदे १) सिलिंगचा कायदा २) अत्यावश्यक वस्तु ग्रहण कायदा ३) जमिन अधिग्रहण कायदा हे कायदे शेतकरयांना गळफास ठरत असून ते रद्द करावेत अशी विनंती सरकारला किसान पुत्र आंदोलक डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर करत आहेत.
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर..
..मो.नं. ९४२००२७५७६
#antifarmerlaws