किसानपुत्र आंदोलनाच्या ५ व्या राज्यस्तरीय शिबीरास अंबाजोगाईत उत्स्फुर्त सुरुवात
देशभरातील निवडक प्रतिनिधींचा उत्स्फुर्त सहभाग
२० आणि २१ आँक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या किसानपुत्र आंदोलनाच्या ५ व्या राज्यस्तरीय शिबीरास येथील मुकुंदराज समाधी परीसरात मोठ्या उत्स्फुर्तपणे सुरुवात झाली. या शिबिरात शेतकरी विरोधी कायदे हे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नाही तर देश बलवान करण्यासाठी रद्द करा अशी मागणी किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांनी केली. देशभरातील निवडक शंभर
शिबीरार्थ्यांनी या परीषदेत सहभाग घेतला.
अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या या ५ व्या राज्य स्तरीय शिबीरास आज २० आँक्टोबर रोजी सकाळी १० वा. भुमीपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली. पहिल्या परीचयाच्या सत्रात उपस्थित सर्व सदस्यांनी आपला परीचय करुन घेतला या नंतर अमर हबीब यांचे “किसानपुत्र आंदोलनाचे वैचारीक अधिष्ठान” या विषयावरील अभ्यास पुर्ण भाषण झाले. आपल्या भाषणात अमर हबीब पुढे म्हणाले की, किसानपुत्र आंदोलन हे शेतकऱ्यांच्या विरोधातील कायद्दे रद्द करण्यासाठीचे आंदोलन आहे. शेतकरी विरोधी कायदे हे शेतकऱ्यांचे भले करण्यासाठी रद्द करु नका तर देश बलवान करण्यासाठी शेतकरी विरोधी कायदे संपवले पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकरी बलवान झाल्याशिवाय बलवानराष्ट्र निर्माण होणार नाही, म्हणून शासनाने या प्रश्नाकडे राष्ट्र उभारणीचे काम आहे हे अगोदर समजून घेतले पाहिजे.
शेतकऱ्यांचे प्रश्न हे देशातल्या सर्व प्रश्नाचे मुळ कारण असून शेतकऱ्यांचे प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे. कारण शेतकरी हा देशाच्या विकासासाठी निघालेल्या रेल्वेचे इंजिन आहे. इंजिन थांबले तर रेल्वे थांबेल आणि सोबतच विकास ही थांबेल हे सुत्र शासनाने समजावून घेतले पाहिजे. आपल्या भाषणात अमर हबीब यांनी देशातील शेतकऱ्यांची स्थिती आज अत्यंत जर्रर झाली असल्याचे सांगून या स्थितीत अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी किसानपुत्रांनी पुढे येवून सहभाग घ्यावा असे आवाहन अमर हबीब यांनी केले.
शिबीराच्या पहिल्या दिवशी सागर पिल्लारे (कोल्हापूर) यांनी “कायद्दाचे तत्वज्ञान व आणि शेतकरी विरोधी कायदे” या विषयावरील व्याख्यान सादर केले. आपल्या या व्याख्यानात पिल्लारे यांनी शेतकरी विरोधी कायद्दा संदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले. दोन दिवसीय चालणाऱ्या या पाचव्या राज्यस्तरीय शिबीरात कडू अप्पा पाटील, बरुण मित्रा, आनंद कुमार, प्रदीप, बापू नलगे, भुषण, संध्या पाटील सुधाकर गौरखेडे (औरंगाबाद), मुर्तीज़ापुर, मकरंद डोईजड, प्रा. सुधाकर गोसावी, सुधीर बिन्दू, प्रशांत देशमुख (वर्धा), सतीश डोबले (कारंजा घाडगे), सागर पिलारे, सुभाष खण्डागळे, अशोक पालीवाल, सन्दीप कडवे, तुळशीदास काळदाते, मकरंद डोईजड, राजीव बसर्गेकर, अनंत देशपांडे, चंद्रकांत खंदारे, अंकुश काळदाते, कालिदास आपेट, सुभाष पवार, खाजामिया पठाण, दत्तु आपेट, मुजीब काजी, वैजनाथ शेंगुळे, प्रा. शैलजा बरुरे, आशा हबीब, अनिरुद्ध चौसाळकर, अमृत महाजन, माधव कणबे, संदीप कडवे यांच्या सह इतर मान्यवरांनी या शिबिरात सहभाग घेतला आहे.
आज होणारे कार्यक्रम
दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात सकाळी ९:०० ते १०:०० या वेळेत पुणे येथील अनंत देशपांडे यांचे “किसानपुत्र आंदोलनाच्या वाटचालीचे मुल्यांकन” या विषयावर व्याख्यान तर १०:०० ते ११:३० या कालावधीत पुणे येथील मकरंद डोईजड यांचे “न्यायालयीन लढाई” या.विषयावरील व्याख्यान तर ११:३० ते १२:३० या कालावधीत वाशिम येथील गजानन अहमदाबादकर यांचे “संसदीय लढाई” या विषयावरील व्याख्यान तर दुपारी १२:३० ते १:३० या वेळेत जळगाव येथील इश्वर लिधुरे आणि मयुर बागुल यांचे “जन आंदोलनाची लढाई” या विषयावरील व्याख्यान तर सायंकाळी ३:०० वाजता या दोन दिवसीय राज्य परीषदेच्या समारोपीय कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमात अरुण बत्रा (नवीदिल्ली), अमर हबीब, संदीप कवडे (इंदोर), अंकुश काळदाते यांची भाषणे होणार आहेत.